बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त फारुख शेख याची भेट घेवून दिले निवेदन…. दिवा शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा कधी मिळणार.. संपूर्ण दिवा शहरात औषधी धूर फवारणी होणार की नाही.. गणपती बाप्पाच्या आगमन अगोदर रस्ते व्यवस्थित होणार की नाही….

अमित जाधव-संपादक

दिवा शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा कधी मिळणार
संपूर्ण दिवा शहरात औषधी धूर फवारणी होणार की नाही
गणपती बाप्पाच्या आगमन अगोदर रस्ते व्यवस्थित होणार की नाही

समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त फारुख शेख याची भेट घेवून दिले निवेदन
सन 2019 मध्ये पावसाळ्यात पुर परिस्थीत निर्माण झाली.सर्वत्र पाणी भरले नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले.त्यांना भरपाई तर मिळाली नाहीच. पण पाण्यात भिजल्याने अनेकांना आजार झाले त्यात जवळपास 6महिन्यांच्या चिमुकल्या बाळांच्या सह जवळपास 10 ते 12 नागरिकांना उपचार अभावी जीव गमवावा लागला होता.तरी देखील आजही दिवा शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
सद्या पावसाळा सुरू असल्याने दिवा शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे.दिवा शहरात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नाले सफाई व्यवस्थित झालेली नाही.त्यातच पावसाचे पाणी रस्त्यावर,नाल्यात जमा होवून रोग राई पसरत आहे.दिवा शहरात जवळपास अंदाचे 7 लाख पेक्षा जास्त नागरिक राहतात.येवढी लोकसंख्या असतानाही दिवा शहरात एकही शासकीय दवाखाना,हॉस्पिटल, उपआरोग्या केंद्र अशी कोणतीही सुविधा उपलब्ध का होत नाही?याचा सामान्य दिवा वासियांना प्रश्न पडलेला आहे.शासकीय नियमानुसार ज्या ठिकाणी 5 हजार लोकसंख्या असते तेथे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी 1 उपकेंद्र दिले जाते.तर 20 हजार लोकसंख्या असल्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र दिले जाते. दिवा शहरात अंदाजे 7 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असताना दिवा वासियांना या सुविधा का दिल्या जात नाहीत.
आपण दिवा शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषयी गांभीर्याने विचार करून जो पर्यंत शासकीय हॉस्पिटल बंधण्यात येत नाही तोपर्यंत तात्काळ भाडे तत्वावर जागा घेवून मुंब्रा देवी कॉलनी,बीआर नगर, साबे गाव,दिवा गाव,गणेश नगर,बेडेकर नगर, दातीवली,सदाशी दळवी नगर , नारायण भगत नगर,रिलायन्स टॉवर दत्त मंदिर या ठिकाणी प्रथमोपचार आरोग्य केंद्र किंवा उप आरोग्य केंद्र सुरू करावे.तसेच जागा उपलब्ध होई पर्यंत आरोग्य विभाग ठाणे महानगर पालिका यांच्या मार्फत दिवा शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषयी गांभीर्याने विचार करून किमान 8 डॉक्टर, 16 नर्स , दोन अंबुलन्स सोबत टीम दररोज पाठवून प्रत्येक ठिकाणी नागरिकांना मोफत औषध उपचार करावेत.तसेच संपूर्ण दिवा शहरात साथीचे रोग पसरवू नयेत यासाठी औषधी धूर फवारणी करण्यात यावी.
2) गणपती बाप्पाच्या आगमन अगोदर पावसामुळे खड्डे पडलेला मुंब्रा देवी कॉलनी दिवा स्टेशन रस्ता दुरुस्त करणे,श्लोक नगर फेस 2 सदाशिव दळवी नगर जाणारा रस्ता अर्धवट रस्ता बनवणे, एंजल पराडाईज स्कूल नारायण भगत नगर,दत्त मंदिर रिलायंस टॉवर जाणारा रस्ता तत्काळ बनवण्यात यावा.तसेच दिवा शहरातील रस्त्यांवर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत.ते तत्काळ बनवण्यात यावे. नागरिकांच्या आरोग्याचा ,रस्त्याचा गांभीर्य पूर्वक विचार करून तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांची भेट घेवून केली.यावेळी तरी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त दिवा शहरातील जनतेस न्याय देतील की नाही.राजकीय दबावामुळे परत दिवा वासियांच्या जखमेवर मीठ चोळतील हे लवकरच समजेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे