
रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मी दिल्लीवरून बोलतोय. आम्ही कल्याण रेल्वे स्थानकात एक बॉम्ब ठेवला आहे आणि आता लगेचच आम्ही रेल्वे स्टेशन उडवून देऊ, असा धमकीचा फोन मुंबईतील उल्हासनगर पोलिस ठाण्यात आला अन् एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तब्बल तीन ते चार तास कल्याण स्थानकात सर्च ऑपरेशन केले. मात्र काहीच सापडले नाही. शेवटी तो फोन केवळ अफवा पसरवण्यासाठी होता, असे कळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.