बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (खरात गट) मुंबई महानगरपालिकेच्या 15 जागांवर लढणार – सचिन खरात

अमित जाधव-संपादक

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (खरात गट) मुंबई महानगरपालिकेच्या 15 जागांवर लढणार – सचिन खरात
मुंबई (प्रतिनिधी ) पुढील काही महिन्यात मुंबई महानगरपालिका निवडणुका पार पडत असून यातील 15 जागेंवर रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्ष भेट घेण्यात येणार आहे.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (खरात गट) या पक्षाने आज मुंबई पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी येत्या काही महीन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.यातील मुंबईतल्या 15 जागांसाठी ही मागणी करणार आहोत.प्रभाग क्र. 104 मुलूंड,प्रभाग क्रं. 119 भांडुप, प्रभाग क्रं.121 विक्रोली, प्रभाग क्रं.125 पवई, प्रभाग क्रं.137 रावाई काँलनी, प्रभाग क्रं.139 ट्रांम्बे, प्रभाग क्रं.140 मानखुर्द , प्रभाग क्रं.145 चेंबर, प्रभाग क्रं.150 बीआरसी, प्रभाग क्रं.151 माहुल, प्रभाग क्रं.155 कुर्ला, प्रभाग क्रं.156 कुर्ला, प्रभाग क्रं.160 चेंबुर, प्रभाग क्रं.192 धारावी 15 जागांसाठी आमचे उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.
*भाजपाला हरविणे हा एकमेव उद्देश*
यावेळी सचिन खरात यांनी आपला उद्देश स्पष्टपणे बोलून दाखविला आहे.ते म्हणाले की, 14 वर्षे रिपब्लिकन पक्ष (खरात गट) राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचा मित्रपक्ष म्हणून राहीला आहे.त्यामुळे आम्हाला निवडणुक लढविण्याची संधी देतील.परंतु नाही दिले तरी या पक्षासोबत आम्ही निष्ठेने काम करणार आहोत.मुळात निवडणुक लढविण्याचा उद्देश हा भाजपाला कोणत्याही परिस्थितीत हरविणे हा आहे.भाजपा हा जातीवादी,धर्मांध आणि भांडवलशहांचा पक्ष आहे.जागा मिळविणे हे आमचे उद्धिष्ट नाही.सर्वांत मह्त्वाचे म्हणजे लोकशाही वाचली पाहीजे,संविधान वाचले पाहीजे.जागा मिळो अगर न मिळो त्यापेक्षा भाजपाला हरविणे अत्यंत महत्वाचे आहे.
*देहूतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपमानाचा केला निषेध*
देशाचे पंतप्रधान देहू येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते.सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजिदादा पवारही उपस्थित होते. प्रोटोकाँलनुसार पंतप्रधान मोदींच्या भाषणाअगोदर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भाषण होणे अत्यावश्यक होते.परंतु भाषण करु न देणे म्हणजे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचा अपमान आहे असे सांगून जाहीर निषेध केला.यावेळी येत्या राष्ट्रपती निवडणुकीत शरद पवार हेच राष्ट्रपती व्हावेत अशी मागणीही रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे