बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मॉल व किराणा दुकान येथे वाईन चा परवाना देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा समाज,युवा,आध्यात्म व महिलां चे विरोधात च हेतूपुरस्सर घेतल्याचे स्पस्ट दिसते* *शासनाला नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे.

अमित जाधव-संपादक

*मॉल व किराणा दुकान येथे वाईन चा परवाना देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा समाज,युवा,आध्यात्म व महिलां चे विरोधात च हेतूपुरस्सर घेतल्याचे स्पस्ट दिसते* *शासनाला नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे.*

सध्या स्थितीत शेतक_यांचे हित पुढे दर्शवुन आघाडी महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला की वाईन, मध्य, दारु हे मॉल,शॉपि,किराणा दुकानात ,जनरल स्टोअर्स म्हणजे जवळ जवळ सर्वत्रच खुल्या प्रमाणात विक्री करण्याचा असा निर्णय घेतला व असे परवाने देण्यात ही येतिल.हे परवाने जास्तीत जास्त आपल्याच जवळचे खास व्यक्तिंना देतील ते पुढे वाईन विक्री करुन आपल्या तिजो_या सात पिढी करीता भरतिल . व ज्या घरात वाईन,मध्य,दारू पिली जाते ते घर नर्क बनेल याचा यांना जराही भान नाही. आमची सत्ता आहे , हम करे सो कायदा. मघ पेना_यांच्या आया,बाया काय करतील. महिलांना रस्त्याने जातांना पेना_या पासून त्रास सहन करावा लागेल. रस्याने चालने, त्यांना रस्ता ही कमी पडतो चालायला. व त्यांच्या घाणेरड्या शिव्या एकने. तसेच युवती यांना रस्त्याने जातांना त्रासस होनार. म्हणजे महीला काही आनंने करीता मॉल, किरणा शॉप,जनरल शॉप गेली असता समस्यांना तोंड द्यावे लागणार. नशा करना_याची भितीच युवती,महिलांना राहिल. नशा केल्यानेच तर छेडछाड,बलात्कार,चोरी_चकारी व कुरितिला चालना मिळते.
वाईन सर्वत्र मोकळी करणे पेक्षा मंदीर मंदीर युवा बेरोजगार याला फुल विक्रीचा व्यवसाय, अतिक्रमण धारकांना शासनाचे हद्दीत मालकीची दूकाने उपलवबध करुन द्यावी . वाईन बाबत घेतलेला हा शासनाचा निर्णय समाज हिताचे, युवा,पुरुष,महिलां च्या तसेच शेतकरी हिताचे विरुधच वाटतो. हे आघाडी सरकार समाजातील युवा पिढीला व जेस्ठ पुरुषाला व्यसनाधींनते कडे नेण्याचे बेतात आहे. याचा सर्व स्तरीय बहीस्कार होत आहे व व्हावा. कारन वाईन हे गंगाजल की आम्रित वाटत आहे आघाडी सरकारला. त्यापेक्षा प्रत्येक मंदीरात गंगाजल विकण्याचे परवाने द्या. आज समाज हा 21 व्या शतकात वाटचाल करुन . डिजिटल इंडिया म्हणुंन विश्वात आपली ओळख निर्माण करित आहे. तसेच आध्यात्म क्षेत्रात गगन भरारी घेत आहे . समाजातील युवा,युवती हे तांत्रिक शिक्षण घेवुन आपला ठसा भारत देशात व विश्वात उमटवत आहे. यापूर्वीच कायदा हा दारूबंदी विरिधात होता, गावात,शाळा,रहदारी जवळ दुकान हटाव कायदा . महिलांनी मोर्चे काढुन , निवेदन देवुन पुष्कळशी दारु दुकाने उठविली व दारु विकुन गब्बर झालेयांशी वैर निर्माण करुन घेतले. व्यसन हे कोणतेही असो उदा. वाईन,बियर,दारु,अफिम्ं,चरज,गांजा, ब्राऊन शुगर,इत्यादी हे नशा करण्याचे येरर्वी वरली मट्का,गंजीपा(पत्ते चा जुगार) हया अश्या व्यसनाने समाज,कुटुंब,युवा पिढी हे आर्थिकदृष्ट्या मागे राहते यारीता अनेक साधू_संत,सामाजिक कार्यकर्ते,साहित्यकार,,किर्तनकर,
प्रबोधनकार यांनी समाजाला,यूवांना प्रबोधन केले व आजही करतातच .
देशी_विदेशी दारु,मध्य,यामुळे अनेक कुटुंब ही अस्तव्यस्त झालेली आहेत. व अनेकांचे संसार उदवस्त झालेले आहेत . व अनेक महिलांनी आपल्या नव_याची दारु सोडवणे करीता देवदेव व संघर्ष करुन दारु सोडवली व कितिक महीला जळून, आत्महत्या करुन मेल्या सुधा . काहींनी नवरे सोडले व माय _बापाचे घरी वास्तव्यास आहेत. जेव्हा पति, किव्हा घरातील मुलगा दारु पित असेल त्या घरातील सुख, शांती भंग होवुन घराला नैराश्य हेरतो. त्या घरातील मांन_सन्मान नाहीसा होतो.
आघाडी सरकार म्हणते की ,वाईन मॉल,शॉप,किराणा दुकानात भरपुर विक्री झाल्यास शेतक_यां चे द्राक्ष, फळाला बाजारपेठ निर्माण होइल व जास्त भाव मिळेल. हे फक्त शेतक_यांचे नाव पुढे करुन स्वत:चा हित साधण्याचा बेत आहे . तसेच शतक_यांचे नावाचा ब्रम्हास्त्र आपल्या जवळ ठेवण्याचा शहानपण आहे. जस समाजात जर वाईन,दारू,मध्य चे शासनाचे निर्णयाला कोणी समाजातून विरोध केला तर आम्ही शेतक _यां चे हिताकरीताच हे करत आहोत हे दर्शविणे करीता शेतकरी बांधवांचा उपयोग समाजाविरुध करने हे निदर्शनास येते .
शासनाचे धोरण आहे की या वाईन,दारु ,मध्य जर मॉल,शॉप,किरणा दूकानात विकण्याचे परवाने दिले तर शासनाचा महसूल वाढेल . म्हणजे शासन स्वत:चे महसूल वाढविन्याकरीता समाज विरोधी निर्णय घेण्यास माघ पुढ पाहत नाही.
महाराष्ट्र सरकार ला जर स्वत:चा महसूल वाढावा असे वाटत असेल तर चांगले विकासाची कामे करुन तसेच युवा, महिलांचे हाताला नव_नवीन उध्योग,व्यवसाया करीता कमी दरात सरकारी कर्ज मिळावे. यातुन दुहेरी महसूल मिळेल. जसे शासनाने दिलेल्या रकमेला व्याज व व्यवसायाचे पासून मिळनारा टेक्स(रिटन स्वरुपात) इत्यादी .
अनेक विकासाची कामे करुन . मोठ मोठे उध्योग, व्यवसायाला चालना देवुन महसूल हा जास्त मिळू शकतो .
मी 88_89 मधे समाज सेवा मंडळ रसूलापुर,ता.नांदगावखंडेस्वर,
जि.अमरावती मार्फत घेन्यात आलेल्या *व्यसनाधींन युवकांना व्यसनमुक्त करणेसाठी नैतिक शिक्षणाची आवश्यकता*
या विषयावर निबंध लिहुन चौथा क्रमांक पटकावला होता.
आज वाईन बद्द्ल घेतलेला आघाडी सरकारचा निर्णय(कायदा) पाहून आज या नैतिक शिक्षणाची आवश्यकता महाराष्ट्र आघाडी सरकारला आहे.
वाईन ब्द्द्ल घेतलेला निर्णय पाहून मला हेच म्हणावेसे वाटते की , जागे व्हा आघाडी सरकार व नैतीकता पाळा तुम्हाला ही मुल_बाळ आहेत,आया,बाया, बहीनी आहेत,त्यांना ही पति आहेत की, समाजातील प्रत्येकाचा विचार करा व व्यसनाला समाजातून हद्दपार करणे करीता समाजप्रिय व लोकशाही चा विचार करुन निर्णय घ्या .
वाईन विक्रीचा कायदा याला महिलांनो विरोध करा . हे आपल्यालाच भारी पडेल. आपले संसार उघड्यावर पडेल. समाजाची दुर्दशा झाल्याशिवाय राहनार नाही. व्यभिचार, लुटमार,बलात्कार हया सर्व कुरितिने समाज छिन्न छिन्न होइल. नारिशक्ती💪🏻🙋🏻‍♀️ तुम लक्ष्मी हो, सरस्वती हो,मा दुर्गा हो,अन्नपुर्न्ना हो,मा काली हो . और न जाने क्या क्या रुप है नारी के .
जागो नारी , जागो .
खुलकर विरोध करो .

🙏🏻🙋🏻‍♀️✍🏻 कवयित्री/साहित्यकार सुनिता चायल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे