रत्नागिरी जिल्हा मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर परिसरात शेख कुटुंब गेली २३ वर्षापासून आपल्या वाली वरसाच्या जागेवर पुरव्या सहित राहत असून सुध्दा त्यांना मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे जवळच्या शहरातून कोणी साठे नामक तीन ते चार इसम येऊन जबर मारहाण करत सदरची जागा कोणताही पुरावा नसताना स्व मालकीची सांगून अरेरावीची भाषा करत आहेत.
शेख कुटुंबाने तहसील कार्यालय मार्फत ही त्यांना कळविले जर ही जागा आपल्या मालकीची निघाल्यास आम्ही स्वतः येथील जागा मोकळी करून देऊ असे असताना मात्र तहसील कार्यालय मार्फत अद्याप पर्यंत निर्णय घेण्यात आला नसल्याचे कळविण्यात आले त्या आधीच तीन ते चार साठे आडनाव असलेल्या इसमांनी शेख कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत दोन महीला सह इतरांना जखमी केले यांची पोलिसांनी गंभीर दखल घेत सांगवी पोलिस स्टेशन अंतर्गत सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दखल करण्यात आले आहे सदर घटनेचा पुढील तपास सहपोलिस निरीक्षक नारायण आळे करत आहे.