
मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदे
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. अशातच आता राज्य शासनाने ‘अ, ब, क’ वर्ग मनपांच्या निवडणुकींसाठी प्रभाग रचना तातडीने सुरु करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर या मनपांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान झाली आहे.
