समतोल चे 12 प्रकल्प फक्त लोकवर्गणी च्या सहभागातून……
अमित जाधव-संपादक
समतोल चे 12 प्रकल्प
फक्त लोक वर्गणी यांच्या सहभागातूनच……
अनेक संस्था आजकाल मुळातच जन्म घेतात ते फंड मिळवण्यासाठी किंवा अनुदान घेण्यासाठी मग ते परदेशी असो या शासकीय
खरतर संस्था ह्या स्वयंसेवी असल्याच पाहिजे म्हणजे त्यांच्या कामावर समाजाने विश्वास ठेवला पाहिजे कारण समाजातील एक किंवा अनेक समस्येवर या संस्था कार्य करीत असतात त्यामुळे समाजाला जोडुनच काम केले पाहिजे जेव्हा समाज जोडतो तेव्हा विश्वास सुद्धा वाढतोच अशा संस्थांना कोणाकडे निधीसाठी जाण्याची गरज नसते तर निधी देणारे अशा संस्थांना शोधत येतात
अनेक छोट्या संस्थाना कंपनी सीएसआर किंवा इतर फंड जमा करताना रिपोर्ट किंवा प्रोजेक्ट लिहिताना अडचण येते असे सीएसआर ट्रेनिंग देणारे म्हणतात खरी वस्तुस्थिती अशी आहे की तुमचे काम आदर्श असेल समाजाला पुरक असेल तर कंपनीचे अधिकारी सुद्धा तुमचा प्रोजेक्ट बनवतात व मदतही करतात किंवा आपण आपल्याला येणाऱ्या भाषेत प्रोजेक्ट लिहून दिला पाहिजे आपण इंग्रजी भाषेत रंगवण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे अनेक चुका आपोआपच होतात कारण ती आपली भाषा मुळातच नाही आता तुम्ही म्हणाल कंपनी इंग्रजी भाषेत मागतात तर तुम्ही तुमचा स्वाभिमान तिथे दाखवला पाहिजे आपण नेहमीच आपली भाषा संस्कृती याबद्दल बोलत असतो मग अशा वेळी आपण त्यांच्या समोर का झुकतो फक्त पैशासाठी ?
त्यामुळे आपण समाज सेवा करताना किंवा समाजातील समस्येवर कार्य करताना नैतिकतेच्या जोरावर केले पाहिजे उगाचच खूप काम करत आहोत मोठे मोठे आकडे सांगुन आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत क्षमतेच्या बाहेर जाऊन मोठे काम उभारण्यासाठी धडपड करीत आहोत हे सर्व कशासाठी ?
अनेक लोक बोलतात की जास्त पैसे आले की जास्त काम करता येते असेलही परंतु मनापासून समाज कार्य करणारे आपण बघतोच शिवाय त्या कामात क्वालिटी कशी असेल याचाही विचार केला पाहिजे
समाजात सध्या सक्षम मनुष्यबळ हा खूप महत्त्वाचा घटक मिळवताना तारेवरची कसरत असते हे मनुष्यबळ सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण सातत्याने असणेही गरजेचे असते
सामाजिक कार्यात समतोल राखण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घेऊन समाजकार्य संस्थानी केली पाहिजे उगाचच करायचे म्हणून करायचे असे नसावे ते जास्त दिवस चालत नाही कारण समाज त्यापासून आपोआपच दुर होतो
समतोल ने या संदर्भात एक आदर्श तयार केला आहे समतोल चे सर्व प्रकल्प हे लाँगटाईम चालणारे आहेतच शिवाय फंडिंग एजन्सी ,परदेशी एजन्सी ,शासकीय अनुदान या चक्रात समतोल अडकून न पडता सातत्याने लोकांच्या देणगीतून आर्थिक व्यवहार चालवते
समाजासाठी संस्कृती, भाषा आणि स्वाभिमान जपणारे सर्व प्रकल्प आहेत तिथे अजिबात तडजोड केली जात नाही म्हणून एखाद्या समस्येवर कार्य करताना ते कार्य समाजाने उचलून धरले पाहिजे तरच समस्या कमी होतील हळूहळू का होईना पण कायमस्वरूपी कार्य असेल व समस्या सुद्धा कमी होतील
समतोल च्या प्रकल्पात अनेक लोकांना जोडून अधिक सक्षमपणे कार्य करायचे आहे फक्त साथ आपली हवी आहे …..आतापर्यंत नेहमीच देता पुढे सुद्धा देणार आहात याची खात्री सुद्धा आहे कारण
आपला समाज आत्मनिर्भर समाज ,बालप्रेमी समाज !!!!
विजय जाधव
समतोल फांऊडेशन