
आज दिनांक ०१/१०/२०२४ रोजी १८:४० वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार खारेगाव, कळवा, ठाणे (प.) येथील सह्याद्री शाळेत शिकणाऱ्या एकूण ४० – विद्यार्थांना अन्नातून विषबाधा झाली असून उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.
तसेच, उर्वरित चौकशी कार्यवाही अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे.असे यावेळी कळविण्यात आले आहे