0
2
0
9
7
4
बदलापूरमध्ये नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू
ठाण्यातील बदलापूरमध्ये बारवी नदीमध्ये बुडून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिकेश मुरगु (वय 23), सुहास कांबळे (वय 19) आणि युवराज हुली (वय 18) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक मित्र पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र गेला. दोघांनाही बुडताना पाहून तिसरा मित्र गेला आणि तिघेही एकमेकांना वाचवण्याच्या नादात नदीत बुडाले.
0
2
0
9
7
4



