निवडणूक जवळआली की भीक दिल्यागत पाणी वाढणारची घोषणा कसली करता,दिव्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याची शिवसेनेची इच्छा नाही! भारतीय जनता पक्षाचे रोहिदास मुंडे यांचा सेनेवर हल्लाबोल…
अमित जाधव-संपादक
निवडणूक जवळआली की भीक दिल्यागत पाणी वाढणारची घोषणा कसली करता,दिव्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याची शिवसेनेची इच्छा नाही!
भारतीय जनता पक्षाचे रोहिदास मुंडे यांचा सेनेवर हल्लाबोल
दिवा:-निवडणूक आली की भीक दिल्यागत पाणी वाढनार असल्याचे सत्ताधारी सांगतात,दिव्यातील जनतेला अजून किती गृहीत धराल असा सवाल भारतीय जनता पक्षाचे रोहिदास मुंडे यांनी केला आहे.येथील पाणी प्रश्न सोडवण्याची सत्ताधारी सेनेची इच्छा नाहीदिव्यातील ,जनतेला पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या शिवसेनेने नागरिकांची माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
दिव्याला अतिरिक्त पाणी मिळणार असे सत्ताधारी शिवसेने मार्फत सांगण्यात येत आहे. निवडणूक जवळ आल्याने बैठका सुरू असल्याचे दाखवले जात आहे.मागील 10 वर्षे दिव्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना सत्ताधारी काय करत होते?आता अतिरिक्त पाणी मिळणार असे सत्ताधारी सांगत असतील तर आतापर्यंत हे सत्ताधारी मुहूर्त शोधत होते का?असा संताप भारतीय जनता पक्षाचे रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. दिव्यातील पाणी टंचाई सोडवायची नाही,जर पाणी प्रश्न कायमचा सुटला तर पाण्याच्या नावाने दर वर्षी यांना मतदान कोण करणार?पाण्याच्या नावाने मते मिळावीत म्हणून दर पाच वर्षानी हे सत्ताधारी थोडं थोडं पाणी वाढवण्याची घोषणा करतात का?असा प्रश्न मुंडे यांनी विचारला आहे.