बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मतदानाचा हक्क बजाविणे ही काळाची गरज -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार दिवस उत्साहात साजरा…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दि. २५ (प्रतिनिधि) :लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे. मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी सुट्टीसाठी न जाता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदान दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यासह जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रेवती गायकर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर, अपंग विकास महासंघ, कल्याण चे अध्यक्ष अशोक भोईर, ठाणे जिल्हा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे सिताराम राणे, ठाणे सिटीझन्स फाउंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन, किन्नर अस्मिता संस्थेचे स्वयंसेवक सिमरन केणे हे मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत सरकारमध्ये प्रतिनिधी पाठविण्यासाठी मतदान गरजेचे आहे. जनतेच्या विचाराचे प्रतिबिंब मतदानामध्ये उमटून सरकार निवडले जाते. त्यासाठी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क नक्की बजावावा.
अभिनेते डॉ.गिरीश ओक यांनी मतदान हा हक्क असून, तो आवर्जून बजावायला हवा. नवीन पिढीला समजून घ्यायला हवे. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. उमेदवार चांगला असेल, तर त्याला मतदारांकडून मतदानाच्य रुपाने निश्चित चांगला प्रतिसाद दिला जाईल, असे मत व्यक्त करुन योग्य उमेदवार निवडण्यासाठी पूरक व्यवस्था आवश्यक आहे. ती भूमिका निवडणूक आयोगाकडून पार पाडली जात आहे, अशा शब्दात श्री. ओक यांनी शासकीय व्यवस्थेचे कौतुक केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात मतदार नोंदणी मोहिमेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल जोशी बेडेकर कॉलेज, बांदोडकर कॉलेज, ज्ञानसाधना कॉलेज, अभिनव कॉलेज यांना गौरविण्यात आले. तर कार्यक्रमाच्या दरम्यान नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरुपात मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा संदेशही दाखविण्यात आला. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले मै भारत हूं आणि राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसारित केलेले गीत प्रसारित करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार, महसूल सहाय्यक, संगणक सहायक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना तहसिलदार आसावरी संसारे यांनी केले तर तहसिलदार वृषाली पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील तहसिलदार स्मिता मोहिते, तहसिलदार (निवडणूक) प्रदीप कुडाळ, , नायब तहसिलदार स्मितल यादव, नायब तहसिलदार नीलिमा मेंगाळ, अव्वल कारकून ऋषिकेश कुलकर्णी, मनोज फर्डे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे