
राज्यात विधानसभा निवडणुका कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर निवडणूक असेल, असे अजित पवार म्हणाले आहेत. ते सोलापुरात बोलत होते. अजित पवारचा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तुम्ही काळजी करू नका, मी फार स्पष्ट आहे असंही ते म्हणाले.