
मनपा निवडणुका ऑक्टोबरनंतर होणार !
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. आता या निवडणुका ऑक्टोबर महिन्यानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पालिका निवडणुकांसंदर्भात 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण यावर निकाल आला तरीही तत्काळ निवडणुका घेणे अशक्य नसल्याने निवडणुका ऑक्टोबरनंतर होतील. ओबीसी आरक्षण तसेच वॉर्ड पुनर्रचनेचा तिढा यांमुळे 5-6 वर्षांपासून या निवडणुका रखडल्या.