ठाण्यात भारतीय मराठा संघाचे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर संपन्न….
अमित जाधव-संपादक
ठाण्यात भारतीय मराठा संघाचे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर संपन्न.*
ठाणे, ता 11 एप्रिल ( संतोष पडवळ) : भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष श्री अविनाश पवार व सरचिटणीस राजेंद्र पालाडे यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र प्रदेश सचिव एस डी पाटील यांच्या निदर्शनाखाली मंगला हायस्कूल सभागृह, कोपरी, ठाणे,पूर्व येथे मराठा बांधवांसाठी मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असलेली शासनाची उदासिनता व दाखवलेल्या निष्क्रियतेमुळे मुलांना शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळत नाही त्यामुळे मराठा समाज दिवसागणिक मागे पडत चालला आहे याची खंत उराशी बाळगून हा समाज यापुढे व्यवसाय व उद्योग या क्षेत्रांमध्ये कसा यशस्वी होईल .मराठा तरुणांनी नोकरी न करता व्यवसाय ,उद्योग करावेत नोकरी न करता नोकरी देणारे बनावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्रास्ताविक भाषण करताना शैक्षणिक पात्रता असून मराठा तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून ते प्रदेशात जात आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे अशी खंत व्यक्त केली आणि त्यासाठी मराठा तरुणांनी व्यवसाय करावेत असे आवाहन भारतीय मराठा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.
सदर शिबिरात कौशल्य विकास महामंडळाचे मिलिंद भोसले यांनी शासनाच्या अधीन येणारे विविध निशुल्क कोर्सेस व त्यातून निर्माण होणारे रोजगार व्यवसाय याबद्दल माहिती दिली.व्यवसाय मार्गदर्शन प्रमुख वक्ते अजय दरेकर यांनी व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करून आपल्या उद्योग व्यवसाय कशा तऱ्हेने यशस्वी त्यासाठी मेहनत,चिकाटी, सातत्य व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा शक्ती असावी लागते हे अगदी समर्पकपणे उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे प्रशांत कांबळे सर यांनी मंडळातून व्यवसाय करिता मिळणारे अर्थसहाय्य व अनुदान याबद्दल सविस्तर पणे माहिती दिली आणि भारतीय मराठा संघाच्या माध्यमातून येणाऱ्या तरुणांना योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.दि. नेशनल को-ऑपरेटिव्ह बँकेचे पवार सर यांनी आण्णासाहेब विकास महामंडळ या योजनेतून फक्त मराठ्यांना कर्ज मिळाले त्याचा त्यांनी लाभ घ्यावा शासकीय अनुदान,व्यवसाय कर्ज व त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा परतावा याबद्दल मार्गदर्शन केले.
मराठा समाजातील उद्योजक, व्यवसायिक प्रेरित व्हावा या उद्देशाने यशस्वी उद्योजकांना *”मराठा उद्योग रत्न पुरस्कार”* पुरस्कार”देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मराठा उद्योजक प्रकाश श्रीपती पाटील,बाबुराव दत्तात्रय सागावकर,बळीराम हरी पाटील, संदीप नारायण जाधव, उत्तम कुमार जयवंत सावंत, राजेंद्र बाबुराव सूर्यवंशी व पोलिस उपनिरीक्षक विश्वास बंडू पाटील यांना *मराठा गौरव* पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन भारतीय मराठा संघाचे ठाणे जिल्हा सचिव अनिल काकुलाते यांनी उत्तम प्रकारे केले
याप्रसंगी भारतीय मराठा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पालांडे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनघा जाधव ,महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश महापदी, खजिनदार अजित जाधव,ठाणे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विनोद जाधव,ठाणे महानगर संपर्कप्रमुख अरूण फणसे, महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्या सुनीता गव्हाणे, दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर ठाणे जिल्हा महिला सचिव तपस्या कश्यप,निलेश म्हसकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची संपूर्ण धुरा ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील सर,ठाणे शहर अध्यक्ष उमेश गोगावले ठाणे शहर महिला अध्यक्षा उषा केंजाले यांनी सांभाळली.सदर शिबिर यशस्वी होण्याकरता समीर सावंत,सुधीर घाणेकर, शिवाजी पाटील,दिलीप लटके रामकृष्ण सावंत, राकेश मोरे ,नारायण उतेकर, रोहित जगदाळे यांनी घेतली.