दिवावासीयांचा पाण्यासाठी भाजपच्या नेतृत्वात ठाणे महापालिकेवर भव्य मोर्चा…
अमिट जाधव-संपादक
बेधडक ठाणे न्यूज
दिवावासीयांचा पाण्यासाठी भाजपच्या नेतृत्वात ठाणे महापालिकेवर भव्य मोर्चा*
अनधिकृत बांधकामासाठी पाणी आहे मात्र दिवेकारांना पिण्यासाठी पाणी नाही सत्ताधारी बिल्डर लॉबीसाठी काम करतात दिव्यासाठी नाही-आमदार संजय केळकर
ठाणे:-दिवा शहरातील भीषण पाणी टंचाई विरोधात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिवावासीय बुधवारी ठामपा मुख्यालयावर धडकले.हजारो महिलांनी हातात रिकामे मडके घेऊन सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
दिवावासीयांच्या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे आमदार संजय केळकर,माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केले.पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सचिव संदीप लेले गटनेते मनोहर डुंबरे संजय जी वाघुले जिल्हा संघटक सरचिटणीस विलासजी साठे मनोहर सुगदरे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर ओबीसी मोर्चा अध्यक्ष सचिन केदारी महिला अध्यक्ष मृणाल पेंडसे,दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे,महिला मंडळ अध्यक्ष ज्योती पाटील जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार ओबीसी उपाध्यक्ष विनोद भगत अशोक पाटील विजय भोईर गणेश भगत राज कांत पाटील अंकुश मडवी मंडल संघटक सरचिटणीस दिलीप भोईर सरचिटणीस युवराज यादव समीर चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उत्तर भारतीय सरचिटणीस अवधराज राजभर गुजराती सेल अध्यक्ष रमेश वोरा डॉक्टर से आघाडी विद्यासागर दुबे अनुसूचित जाती अध्यक्ष सुधीर घोलप व्यापारी आघाडी अध्यक्ष जयदीप भोईर वार्ड अध्यक्ष प्रकाश पाटील नागेश पवार मधुकर पाटील
प्रवीण पाटील सीमा भगत राजश्री मुंडे सपना भगत रेश्मा पवार रेणुका यादव संगीता भोईर राहुल साहू अशोक सोलंकी अमरनाथ गुप्ता समशेर यादव जिला जीत तिवारी प्रशांत आंबोळकर रामबाबू सोनी आशिष पाटील व दिव्यातील पदाधिकारी यांनी नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.दिव्यात पाणी पिणे महाग झाले असून नागरिकांना महिन्याला 2 ते 3 हजार रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागते. शहरातील महिला या पाणीटंचाई ने त्रस्त आहेत.येथील नागरिकांना दिलासा कधी देणार असा सवाल करत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी पालिका आयुक्तांना धारेवर धरले.