बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे कालिपट्टी आणि धारणा आंदोलन…

अमित जाधव-संपादक

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे कालिपट्टी आणि धारणा आंदोलन…..

Kराष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ भारत सरकारच्या श्रमिक मंत्रालया कडून मान्यता प्राप्त असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संघटन विरहित कर्मचाऱ्यांचा गेल्या एक आठवड्यापासून हक्क अधिकारासाठी निरंतर संप सुरू आहे. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखा महाराष्ट्रच्या वतीने एस.टी. महामंडळातील कामगार, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आणि अधिकारासाठी रस्त्यावरची लढाई मागील एक वर्षांपासून लढत आहे आणि यापुढेही लढत राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य शाखा आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखा महाराष्ट्र च्या वतीने दोन चरणातील आंदोलन दिनांक 3 नोव्हेंबर 2021 पासून दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पर्यंत कालिपट्टी आंदोलन आणि दिनांक 10 नोव्हेंबर 2021 ला एकाच दिवशी महाराष्ट्रातील 36 ही जिल्ह्यात मा जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणा आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत 1) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विलनिकरण महाराष्ट्र राज्य शासनाच्या त्वरित करा. 2) आत्महत्या केलेल्या परिवाराला पन्नास लाख रुपये त्वरित देऊन परिवारातील एका सदस्याला महिन्याभरात नोकरी द्या. 3) एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे थकीत करारासह पुढील करार त्वरित करा. 4) अन्यायकारी शिस्त व आवेदन प्रणाली त्वरित रद्द करा. 5) कर्जबाजारी केलेल्या एस.टी. महामंडळातील कामगार कर्मचाऱ्यांचे ST कोपरेटिव्ह बँकेचे कर्ज माफ करा. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.*
*2013 मध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की, आमची सत्ता महाराष्ट्रात आल्यास एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्यात येईल, सन 2014 ते 2019 पर्यंत भाजपा आणि शिवशेना यांच्या युतीचे सरकार सत्तेवर असतांना एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण का केले नाहीत? सन 2016 ला असेच ऐन हंगामाच्या वेळी याच मान्यताप्राप्त आणि कृतीसमितीने कोणत्याही संपाची नोटीस न देता बेकायदेशीर 2 दिवशीय संप घडवून आणला होता, त्याचा पद्धतीने सन 2017 ला 4 दिवशीय संप घडवून आणला होता, दोन्ही संपाच्या वे भाजपाचे सरकार सत्तेत असतांना कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली होती. मा आता भाजपाचेच बांडगुळ आमदार हे एस.टी. कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर संप करायला लावून दिशाभूल करीत आहे. यावर एस.टी. कर्मचाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने चिंतन व समिक्षा करण्याची गरज निर्माण झाली आहे.*
*यासह एस.टी. महामंडळातील काम करणाऱ्या बांधवांना अपील करण्यात येते की, आपण आत्महत्या न करता धैर्याने, संयमाने आपले एस.टी. महामंडळ राज्य शासनात विलनीकरण करण्यासाठी आणि इतर संविधानिक न्याय, हक्क अधिकारासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनची MSRTC या विंग सोबत राहून दोन्हीही टप्प्यातील कालिपट्टी आंदोलन आणि जिल्हास्तरीय धरणा आंदोलन मोठ्या प्रमाणात सफल करण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांनी केले आहे.*
*जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, जिल्हा नवी मुंबई.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे