शिक्षकेतर कर्मचारी संघ व भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे खाजगीकरणा च्या विरोधात महामेळावा…
अमित जाधव - संपादक
“शाळा वाचवा- शिक्षण वाचवा-शिक्षक वाचवा”* या अभियानांतर्गत शिक्षण-आरक्षण -नोकरी-पेन्शन-हक्क यांच्या खाजगीकरणाच्या विरोधात व सर्व प्रकारच्या शोषणकारी कंत्राटी भरतीच्या विरोधात येत्या 25 फेब्रुवारी रोजी बीकेसी मैदान बांद्रा मुंबई येथे राज्यस्तरीय महामेळावा होणार आहे.
त्या अनुषंगाने ठाणे जिल्हातील दिवा येथे भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे प्रचारक महेश गडांकुश, बाळासाहेब गायकवाड, देवेंद्र बनसोडे, नरेंद्र गजभिव,अमोल वळुंज, मुकेश वाघोदे, सुनिल कांबळे, सोनिया पवार, कल्पना बनसोडे, शिला गडांकुश या कार्यकर्त्यांनी दिवा येथील विविध शाळांमध्ये भेटी दिल्या.
अंगणवाडी सेविका, शाळा ,कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी, पालक त्याचबरोबर अनेक सामाजिक राजकीय मंडळी यांनी या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आले।
भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्यासह माजी आमदार मा. लक्ष्मण माने , आमदार मा.जयंत पाटील मा. बाबा आढाव, माजी न्यायमूर्ती मा.टि. व्हि.नलवडे, नितेश कराळे त्याचबरोबर शिक्षक मतदार संघाचे आमदार येणार आहेत भारत मुक्ती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रवादी पार्टी, भूमिपुत्र पार्टी व आश्या अनेक सामाजिक, राजकीय नेत्यांनी सक्रीय सहभाग दर्शवून मोठ्या संख्येने या महामेळाव्यात उपस्थित राहणार आहेत आणि आपण ही उपस्थित राहावे अशी विंनती आयोजकांनी केली आहे