औरंगाबाद:
गुरुवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी गणेश जगन्नाथदास वाघ या 37 हे गेल्या 20 वर्षांपासून राहुल साहुजी यांच्याकडे कामाला होते. साहुजी यांच्या घरी डिश टिव्ही बसवायला जाण्यापुर्वी त्यांनी गुटखा खाल्ला. काम करताना अचानक ठसका लागल्यामुळे ते बेशुद्ध पडले. साहुजी यांच्या घरातील सदस्यांनी इतरांच्या मदतीने तातडीने गणेश त्यांना घाटी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तपासणीत गुटखा खाताना खोकला आल्याने सुपारी घशात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवन्यात आले आहे