बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवावासीयांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मनसेचे आमरण उपोषण………

अमित जाधव-संपादक

दिवा (प्रतिनिधी) दिव्यातील प्रभाग क्रमांक २८ मधील रहिवाश्यांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न भेडसावत असल्यामुळे आजपासून दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे ठरविले आहे.

प्रभाग क्रमांक २८ मधील बेडेकरनगर,गणेशपाडा,साईबाबा मंदिर परिसर,गणेश नगर,म्हात्रे गेट या परीसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची परिस्थिती आहे.प्रभाग क्र.२८ मध्ये काही ठिकाणी रहीवाशांना टँकरचा पाणीपुरवठा करताना रस्त्यांची सोय नसल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या मुद्यावर वारंवार पाठपुरावा करुनही पालिका कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे येथील लोकप्रतिनिधी,प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विभाग अध्यक्ष श्री तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अध्यक्ष श्री मोतीराम दळवी,शैलेंद्र कदम आणि महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.दरम्यान उपोषण स्थळी विविध सामाजिक कार्यकर्ते भेट देवून पाठींबा दर्शवित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे