बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

कर्तृत्ववान महिलांच्या पंक्तीत बसलेलं एक नाव…वर्षाताई कांबळे….

अमित जाधव-संपादक

जिद्द असेल तर अशक्य गोष्टही सत्यात उतरवता येते’ हे आपण सगळेच जाणतो. पण मनी बाळगलेली स्वप्न सत्यात उतरवण्याचा जे प्रयत्न करतात तेच आपला ठसा उमटवून जातात. अशाच काही महिला असून त्यांची यशोगाथा त्याच्या जन्मदिवसा निमित्त आज आपण जाणून घेणार आहोत. या यशस्वी समाजसेविका व उत्कृष्ट राजकारणी नविमुबईतील कामोठे येथील रहिवासी असून त्याचं शिक्षण (एम.कॉम) प्रयन्त आहे तुमच्यापैकीही अनेकींना काहीतरी वेगळे करण्याची इच्छा पण मार्ग मिळत नसेल तर तुम्हाला यांची यशोगाथा नक्कीच प्रेरणा देतील.तर अशा वर्षा कांबळे यांच्या विषयी जाणून घेऊया.
वर्षा ताई कांबळे या मृण्मयी फाउंडेशनच्या संस्थापक अद्यक्ष असून उत्तम राजकारणी देखील आहे.भारताचे केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ)गटाचे राष्ट्रीय अद्यक्ष मा. रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पक्षच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष असून त्यांनी समाजातील अणेक लोकांच्या समस्येचं अडीअडचणीच्या वेळी निराकरण केलं आहे.पँथर द पावर युथ मुव्हमेंट च्या देखील त्या महाराष्ट्र प्रमुख असून संघटनेच्या वाढीसाठी त्यांचं भरीव योगदान आहे.सुप्रीम कोर्ट द्वारे संस्थेच्या माध्यमातून सुमारे पाच हजार नागरिकांच्या रोजगार निर्मितीवर त्यांचे काम सुरू असून लवकरच त्या हा प्रश्न मार्गी लावून न्याय मिळवून देतील.महिला किंवा पतीपत्नीच्या वादविवाद च्या अनेक अडचणीच्या वेळी त्या समुपदेशन करून किंवा स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन सभांधित विषय योग्य पद्धतीने हाताळतात व महिलांना न्याय मिळवून देत असतात.तसेच स्वनियमक संस्था मृण्मयी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू ना दररोज नित्यनियमाने अन्नदान सुरू असून शेकडो लोक त्याचा लाभ घेत आहे अश्या महान व कर्तृत्ववान महिलेचा आज वाढदिवस त्यामुळे अनेक सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे