महाराष्ट्र.शाळांची वेळ बदलण्यासंदर्भात राज्य सरकारने जीआर जाहीर केला आहे. चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतर भरवा, असा आदेश शाळांना देण्यात आला आहे. काही प्राथमिक शाळा सकाळी 7 वाजता सुरु होतात. पण याचा विद्यार्थ्यांच्या झोपेवर परिणाम होत असल्याने वेळ बदलण्याचा विचार करावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे 65 हजारांपेक्षा जास्त शाळांची वेळ बदलणार आहे.