बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा रेल्वे अपघातातील बळी हे रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे*– अँड.आदेश भगत ,प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचा प्रवासी संघटनेचा आरोप…

अमित जाधव-संपादक

*दिवा रेल्वे अपघातातील बळी हे रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे*– अँड.आदेश भगत

*प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचा प्रवासी संघटनेचा आरोप*

“दिवेकर रेल्वे प्रवाशांच्या मागणी नंतर व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे दिवा स्थानकाचा मेकओव्हर झाला असला तरी काही अतंर्गत सुविधांकडे रेल्वे प्रशासन अजूनही कानाडोळा करत आहे. दिवा पूर्वेला मुंबई दिशेकडे उतरणारा जिना अरुंद असल्यामुळे तिथे होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रवासी रेल्वे रूळ ओलांडण्याला पसंती देतात. आणि त्यामुळेच दिवा स्थानकात सुरू असलेली अपघातांची मालिका थांबत नाही. आज सकाळी तीन प्रवाशांना रेल्वे ची धडक लागल्याने दोन प्रवाशांना जागीच प्राण गमवावे लागले होते.
दिवा शहराची ९० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही पूर्वेला असून रेल्वेचे एकमेव तिकीट घर मात्र पश्चिमेला आहे. त्यामुळे बहुतेक प्रवासी तिकिट काढण्यासाठी सर्रास रेल्वेरूळ ओलांडताना दिसतात. दिव्यातील प्रवाशांर्फे व प्रवासी संघटनेतर्फे सातत्याने मागणी केली जाते की, मुंबई दिशेकडील दिवा पूर्वला उतरणारा जिना हे तो रुंद करावा अथवा तेथे सरकता जिना बसवावा जेणेकरून प्रवासी पादचारी पुलाचा वापर करतील. परंतु याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसते आणि त्यामुळेच वारंवार येथे अपघात होतात. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे नुकतंच रेल्वे रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांवर भारतीय दंड संहिता कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खरंतर दिव्यासारख्या अन्य ठिकाणी रेल्वे प्रशासनातर्फे पर्याप्त सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव रेल्वेरूळ लागत आहे, अशा ठिकाणी प्रवाशांच्या अपघातासाठी मध्य रेल्वे प्रशासनावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी प्रवाशांची मागणी आहे. दिवा स्थानकात जर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पर्याप्त व्यवस्था केली नाही तर भविष्यात दिवा स्थानकात केव्हाही प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो याची दक्षता रेल्वे प्रशासनाने घेत घ्यायला हवी.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे