ब्रेकिंग
शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील आपल्या दालनातील पाटी केली बदली…
अमित जाधव - संपादक
जागतिक महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र सरकारने राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर केले आहे. यानुसार शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी लावली आहे. ही पाटी सध्या आकर्षणाचा व कौतुकाचा विषय ठरली आहे.