दिव्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित इमारती तोडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले…..
अमित जाधव-संपादक
दिव्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित इमारती तोडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले…….
शिवसेना -पुनवर्सन होत असताना राजकारण कसले करता दिव्याच्या विकासासाठी रस्ता रुंदीकरण गरजेचे….
भाजपा–जबरदस्तीचे पुनर्वसन रहिवासीयांचा माथी, बाधित रहिवासीयांचा तळतळाट शिवसेनेला भोवणार…
दिवा-ठाणे महापालिकेने हायकोर्टाच्या निर्देशानुसार दिव्यात अनेक इमारती जमीनदोस्त केल्या विकासाच्या आड येणाऱ्या या इमारतीतील नागरिकांना पडले गावात स्थळांतरीत करून अधिकृत रित्या रूम देण्यात आले नागरिकांनी आपल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या इमारतीवर कारवाई होताना अश्रू चा बांध फोडला व अनेकांनी विरोध देखील केला म कायद्याच्या पुढे कोणीही मोठा असू शकत नाही हे ठाणे महापालिकेने देखील दाखवून दिले. नागरिकांना बेघर न करता अधिकृत रूम देऊन स्थलांतर केले व नागरिकांना आपल्या नवीन घरात दिवाळी चा आनंद साजरा करण्यास सांगितले.अनेक जाणकारांच्या मते तोडकाम हे दिवाळी च्या नंतर करण्यात यावे त्यामुळे बाधित राहिवासीयांना आपल्या घरात शेवटची दिवाळी ही साजरी करता आली असती किंवा दिव्यातच अन्य ठिकाणी स्थळांतरीत करावे असे नागरिकांनी वेळोवेळी विनवणी केली होती याच कारणामुळे दिव्यातील राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहेत.विरोधी पक्षाने याचा पुरेपूर फायदा घेत अनेक सोशल मिडिया च्या माध्यमातून सत्ताधार्यांना टार्गेट केले आहे.दिव्यातील अनेक राजकीय पक्ष भा.ज.पा,मनसे, शिवसेना यांच्यात तोडफोड प्रकरण चांगलंच गाजत आहेत सत्ताधारी नगरसेवक सुद्धा कोणतीही संधी न दवडता आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.यामुळे तोंडाजवळ आलेल्या निवडुका लक्षात घेता दिव्यातील जनता कोणाच्या परड्यात किती वजन ठेवते ते येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल.दिवा शहरात मोठ्या प्रमाणावर युवा व तरुण वर्ग आहे आणि विचारधारेच्या माध्यमातूनच दिव्यातील जनता मतदानाला सामोरे जाईल असे स्पष्ट दिसत आहे ‘दिव्याचा विकास हाच’ जनतेचा प्रथम केंद्रबिंदू आहे जे ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन बाधित इमारती तोडण्यात आल्या त्यात अनेक तर्कवितर्क लावण्यात आले दिवावासीय बाधित रहिवासीयांचा तोटा की नफा इथप्रयन्त अनेकांनी मजल मारली आता सर्वसामान्य दिवेकरच काय तो निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट करेल. दोष कोनाचा,ते येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल तोपर्यन्त राजकारणाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला मनोरंजन बघता येईल अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे सध्या विरोधकांनी सत्ताधारी नागसेवकांचा जुना विडिओ वायरल करत डिवचले आहे तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सरळ भाजपाला विकास नको असे स्पष्ट करत आपलं मत मांडले आहे.