आगरी समाजाच्या भिवंडी आलीमघर गावच्या ठाण्याच्या पोलीस नाईक सौ.आरती बेळगली मूळच्या (माया पाटील)यांचा ओष्ट्रेलिया येथील भारत सरकारच्या दूतावसात सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती………
अमित जाधव-संपादक
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत विशेष शाखा आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक पदावरील कर्मचारी सौ. आरती आनंद बेळगली यांची नुकतीच विदेश मंत्रालय भारत सरकार मार्फत निवड केल्या जाणाऱ्या सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली असुन त्यांच्या एकूणच गुणवत्तेवर ऑस्ट्रेलिया येथील भारत सरकारच्या दूतावास (इंडियन एम्बेसी) कार्यालयाच्या आस्थापनेवरील मिशनवर नियुक्ती झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील सौ. आरती बेळगली मूळच्या (माया पाटील) ह्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मधील अलिमघर गावच्या असुन त्या सध्या बाळकुम येथे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत.
विशेष म्हणजे विदेश मंत्रालय भारत सरकार तर्फे सहाय्यक सुरक्षा अधिकारी म्हणून होणारी ही निवड अनेक गुणवत्ता व निष्कर्षावर केली जाते. त्यात इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे, वक्तृत्व ,धाडसीपणा मेहनत घेण्याची तयारी सचोटी प्रामाणिकपणा व निष्ठा इत्यादी गुणांसह खेळ, वाहन चालविणे इत्यादी कला गुणांचाही विचार केला जातो. या साऱ्या निष्कर्षांवर आरती बेळगली या सिद्ध होऊन त्यांची झालेली ही निवड कौतुकास्पद आहे.
त्यामुळे ठाणे पोलीस दल व शहर परिसरातील तिच्या मित्र परिवाराकडून तिचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.