आमदार नितेश राणे यांच्या दिवा दौऱ्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन टीका आगासन रेल्वे थांब्याचा विषय केंद्राच्या अख्यारीत असताना राज्यसरकार व स्थानिक नगरसेवकांवर टीका हास्यास्पद…..
अमित जाधव-संपादक
आमदार नितेश राणे यांच्या दिवा दौऱ्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन टीका
आगासन रेल्वे थांब्याचा विषय केंद्राच्या अख्यारीत असताना राज्यसरकार व स्थानिक नगरसेवकांवर टीका हास्यास्पद*
आमदार नितेश राणे यांनी नुकताच दिवा दौरा केला पण कोकणवासीयांचा भरणा असलेल्या दिवा शहरात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने हा दौरा चर्चेला आला आहे. भाजप च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून दौऱ्याचा शेवट सभेने करण्यात आला. नितेश राणेंना आमंत्रित करून कोकणवासीयांना आकर्षित करण्याचा भाजप चा प्रयत्न पुरता फसला. नितेश राणे सभेच्या व्यासपीठावर पोहचले व सत्कार समारंभ सुरू झाला तरी अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. नितेश राणे यांच्या भाषणाच्या वेळेस कशातरी जेमतेम खुर्च्या भरल्या मात्र नितेश राणे यांनी व्यासपीठावरून आपली नाराजी बोलून दाखवली.
अत्यल्प प्रतिसादामुळे चिडलेल्या नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवत असताना विषयांची पूर्ण माहिती न घेताच राज्य सरकार व स्थानिक नगरसेवकांवर टीका केली.
आगासन रेल्वे थांब्याचा विषय हा केंद्राच्या अख्यारीत असताना नितेश राणे यांनी यासाठी राज्यसरकार व नगरसेवकांना जबाबदार धरल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोना काळात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिवा- पनवेल- कोकण मार्गावरील आगासन, बामाळी
व अन्य काही थांबे काढण्यात आले. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर सुद्धा हे थांबे पूर्वरत करण्यात आले नाहीत. यासंदर्भात याविभागातील प्रवाशांनी, ग्रामपंचायतींनी, आपल्या मागणीचे निवेदन रेल्वे प्रशासनाकडे याअगोदरच दिले आहे. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील सदर विषय त्वरित मार्गी लावावा यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
वास्तविक एखाद्या ठिकणी थांबा देणे व काढणे हा सर्वस्वी विषय रेल्वे बोर्डाचा असून केंद्र सरकारच्या अख्यारीत असणारा आहे.
दौऱ्याला मिळालेला अत्य अल्प प्रतिसाद आणि सभेला कोकणवासीयांनी दाखवलेली पाठ यामुळे आपण काय बोलत आहोत याच भान आमदार नितेश राणे यांना राहील नाही.
— *अँड.आदेश भगत*
अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना