दिव्यातील माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी गटारे व सांडपाण्याची योग्यप्रकारे व्हीलेवाट न लावल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपटले कान व समक्ष उभे राहून करून घेतली नाले सफाई…..
अमित जाधव - संपादक
काल झालेल्या अतिवृष्टी कोकणरत्न परिसरात काही विभागात पाणी भरले असल्याचे समजताच माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी त्वरित त्या परीसरातील लोकांना त्रास सहन करावा लागला म्हणून आज ठाणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन त्याठिकाणी स्वतः जाऊन तुंबलेली गटारे ठाणे महापालिकेच्या कामगारांकडून साफ सफाई करुन घेतले व यापुढे परिसरातील गटारे अथवा सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यास अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.काही दिवसापूर्वीच त्यांनी महापालिकेवर नाराजी व्यक्त करत जर नागरिकांच्या समस्या निराकरण होत नसेल अधिकारी वर्ग ,कामगार याना चागलाच धडा यापुढे शिकवला जाईल.
प्रभागातील नागरीकांना कोणतीही समस्या भेडसावत असेल तर त्यांनी कार्यालयात येऊन संपर्क साधावा किंवा व्यक्तिगत सप्रक करावा असे ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले मी माझा व्यक्तिगत भ्रमणध्वनी देखील अहोरात्र आपल्या सेवेसाठी आहे असे कळविले.



