बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दातिवली स्थानकाची उभारणी करा,दातिवलीला पूर्ण स्थानकाच्या मागणीसह, स्थानकातील सुविधा, रेल्वेगाड्या आणि फेऱ्या वाढवण्याची मागणी ,दिव्यातील नगरसेवक रमाकांत मढवी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट……

अमित जाधव-संपादक

#दातिवली स्थानकाची उभारणी करा…

दातिवलीला पूर्ण स्थानकाच्या मागणीसह, स्थानकातील सुविधा, रेल्वेगाड्या आणि फेऱ्या वाढवण्याची मागणी…

काल रेल्वे राज्यमंत्री मा.श्री. रावसाहेब दानवे यांच्यासोबत झालेल्या भेटीत केली मागणी…

#दिवा आणि #कोपर #रेल्वे स्थानकादरम्यान दातिवली #रेल्वे_स्थानक उभारण्याची गेल्या ४० ते ४५ वर्षांपासूनची मागणी आहे. दातिवली स्थानकाच्या उभारणीमुळे त्याचा फायदा सुमारे चार लाख प्रवाशांना होईल तसेच दिवा रेल्वे स्थानकावरील गर्दीचा ताणही कमी होईल. भौगोलिकदृष्ट्या दातिवली स्थानकाचे महत्व ओळखून दातिवली स्थानकाच्या उभारणीची मागणी मान्य करावी, अशी विनंती काल रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे यांच्यासोबत त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात झालेल्या भेटीत केली. या बैठकीस ठाण्याचे मा.उप महापौर रमाकांत दशरथ मढवी, अॅड. आदेश भगत आणि शैलेश पाटील उपस्थित होते.

🔸 देशासाठी महत्वाकांक्षी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पातही दातिवली स्थानकाचा समावेश आहे. याच भागात एमएमआरडीए बीकेसी प्रमाणे विकास केंद्र विकसीत करणार आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी दातिवली स्थानक महत्वाचे केंद्र बनण्याची क्षमता असलेले ठिकाण आहे. #कल्याण-#ठाणे-#मुंबई हा #जलमार्ग ही दातिवली जवळून जातो. त्यामुळे दातिवली हे या सर्वांचे केंद्र ठरू शकते, असे यावेळी बैठकीदरम्यान स्पष्ट केले. यासर्वांचा विचार करुनच दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान दातिवली स्थानकाच्या उभारणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत दातिवली स्थानकाच्या उभारणीची मागणी करत असल्याचे यावेळी सांगत दातिवली स्थानकाची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती राज्यमंत्री श्री.दानवे यांना केली.

🔸 यासोबतच प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सध्या हॉल्ट स्टेशन अर्थात थांबा स्थानक म्हणून असलेल्या दातिवली स्थानकाला #पूर्ण_स्थानकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी देखील केली. दिवा – पनवेल, डहाणू – पनवेल, दिवा – रोहा, दिवा – सावंतवाडी, दिवा – मडगाव इ. रेल्वे गाड्या दातिवली येथे थांबतात आणि अनेक प्रवासी येथून गाड्या पकडतात. मात्र स्थानकात प्राथमिक सोयी-सुविधांची वानवा असून पिण्याच्या पाण्याची सुविधा, #स्वच्छतागृह, #तिकीट_खिडकी स्थानकात नाही. त्यामुळे या स्थानकाला पूर्ण स्थानकाचा दर्जा दिल्यास या सर्व सोयी-सुविधा प्रवाशांना देता येतील असे यावेळी सांगितले.

🔸 #कोकण_रेल्वे,पश्चिम रेल्वेने दिवा स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना परत मध्य रेल्वेवरून इतर स्थानकात जाण्यासाठी गर्दीने भरलेल्या लोकलमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत दिवा स्थानकातून मुंबईसाठी लोकल सोडल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा प्रवाशांना होईल, असे सांगत दिवा स्थानकातून लोकल सोडण्याची मागणी केली. यासोबत दिवा स्थानकात #होम_प्लॅटफॉर्म, #रेल्वे_तिकिट_आरक्षण_केंद्र, पूर्व भागात तिकीट खिडकी उभारण्याची मागणी केली.

🔸 कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईप्रमाणेच दिवा, दातिवली, आगासन, निळजे, तळोजा, नावडे, नावडे, कळंबोली यांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून येथेही लोकसंख्या वाढते आहे. शिक्षण, रोजगारासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे दिवा पनवेल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली.

🔸 #छत्रपती_शिवाजी_महाराज_टर्मिनस ते #पनवेल या मार्गावर लोकलसेवा सुरू करून त्या दिवा मार्गे नेण्याचीही मागणी देखील यावेळी केली.

🔸 सोबतच कोकण रेल्वेवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देणे, कल्याण – #सावंतवाडी ही नवी पॅसेंजर गाडी सुरू करणे, #डहाणू – पनवेल मेमो फेऱ्या वाढवणे आणि #चिपळून – पनवेल उत्सव विशेष गाडी दिवा स्थानकापर्यंत वाढवण्याची मागणी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे