भारतीय जनता पार्टी (दिवा मंडळ) आयोजित उत्तरभारर्तीय परंपरेनुसार जितिया व्रत असलेल्या महिलांन करिता कार्यक्रमा साठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या……..
अमित जाधव-संपादक
भारतीय जनता पार्टी (दिवा मंडळ) आयोजित उत्तरभारर्तीय परंपरेनुसार जितिया व्रत असलेल्या महिलांन करिता कार्यक्रमा साठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या……..
दिवा उत्तर भारतीय राहिवासीयांना त्यांच्या परंपरेनुसार प्रत्येक सण त्यांना दिव्यात मोठ्या आनंदाने साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे मा.नरेश पवार व सौ.रेश्माताई नरेश पवार नेहमीच तत्पर असतात छटपूजा असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून उत्सव पार पडले जातात.
असेच वत्र म्हणून उत्तर उत्तरभारतीय संस्कृती नुसार जितीया वत्र ठेवले जाते परंपरे नुसार सर्व भाविक एकत्र येत हे वत्र पार पाडतात दिवा दातीवली तलाव येथे असंच वत्र 29 सप्टेंबरला बुधवारी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात कोरोनाच्या काळात सर्व नियम पाळत पार पडले सौ.रेश्मा ताई नरेश पवार स्वःह उपस्थित राहून दिव्यातील उत्तरं भारतीय रहिवासीयांचा आनंद द्विगुणित केला व स्वहस्ते महिलांना कलश प्रदान करून शुभेच्छा दिल्या दिव्यातील अनेक उत्तरभारतीय राहिवासियांनी पवार दामत्याच्या माध्यमातून मुक्त पणे वत्र पार पाडत आनंद व्यक्त केला व सौ.रेश्मा ताई यांचा तुलशी रोप व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी ठाणे जिल्हा महासचिव श्री मनोहर सुखदरे, ठाणे उ.भा. मोर्चा अध्य्क्ष श्री शैलेश मिश्रा, नरेश पाटिल, दिवा मंडल महासचिव युवराज यादव, उ भा मोर्चा ठाणे शहर उपाध्यक्ष शमशेर यादव, जिलाजीत तिवारी, राधा शर्मा, शीला गुप्ता, रेणु यादव, नागेश पवार, राम बाबू सोनी, सोशल मीडिया प्रमुख राहुल साहू अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.या पुढे भाजपा सर्व दिव्यातील उत्तरभारर्तीय राहिवासीयांना असेच सहकार्य करून कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही असे सौ.पवार यांनी बोलतांना स्पष्ट केले व दिलेल्या वेळेनुसार सर्व कार्यकर्ते आणि समस्त दिवारहिवासीयांचे अभिनंदन करून कार्यक्रमाची सांगता झाली.