ब्रेकिंग
कुटुंब नाशिकहून बाळाच्या उपचारासाठी आलं मुंबईला, थोडा फिरुया म्हणून मुंबई ऍलिफंटा बोटीत गेले, अन् आई वडिलांसह बाळाचाही मृत्यू..
अमित जाधव - संपादक

नाशिकच्या अहिरे कुटुंबासोबत जे घडलं, ते वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. नाशिकहून आपल्या बाळाच्या उपचारासाठी अहिरे कुटुंब मुंबईला आले होते. मुंबईला आलोच आहोत, तर थोडा वेळ एलिफंटा लेणी फिरण्याचा आनंद घेऊया, असा त्यांनी विचार केला. मात्र अचानक नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेत क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. राकेश नानाजी अहिरे, पत्नी हर्षदा आणि बाळाचाही या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला.