- केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 344 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या दुर्घटनेच्या पाच दिवसानंतर शोधमोहिमेदरम्यान 10 जण जिवंत सापडले आहेत. यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. तसेच 4 लहान मुलेही आहेत. जवानांना काही जण जिवंत ढिगाऱ्याखाली आढळले. तर काही दुर्गम भागात अडकले होते. यातून वाचलेली लहान मुले भूकेने व्याकुळलेली होती. जवानांनी त्यांना खाण्यास दिले.