केंद्र व उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध आसपा चे शेतकरी सन्मान आंदोलन….
अमित जाधव-संपादक
केंद्र व उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध आसपा चे शेतकरी सन्मान आंदोलन
संजय बोर्डे
लखीमपूर येथील शेतकरी व पत्रकार यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्यात शहिदांच्या सन्मार्थ व खाजगी करणाच्या विरुद्ध केंद्र सरकारचा जाहीर धिक्कार निषेध करण्यासाठी शेतकरी सन्मान आंदोलन चे आयोजन केले असून उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खिरी येथील शेतकरी व पत्रकार हल्ल्या विरुद्ध व केंद्र सरकार चे खासगी धोरनआणि उत्तर प्रदेश सरकार च्या गृह राज्य मंत्री मिश्रा च्या मस्तावलेल्या मुलाचा जाहीर धिक्कार व त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी जाहीर निषेध करणार आहे. जनतेच्या मनातील रोष व्यक्त करण्यासाठी आजाद समाज पार्टी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ऍड चंद्रसेखर आजाद रावण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शेतकरी (किसान )सन्मान आंदोलन मालवणी गेट नं १ फायर ब्रिगेड या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत राहून विधायक मार्गाने व कोरोना नियमाचे पालन करून करण्यात येणार आहे. हे आंदोलन आजाद समाज पार्टी चे मुंबई अध्यक्ष कैलास जैस्वार यांच्या मार्गदर्शना खाली होणार आहे केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार च्या विरुद्ध तीव्र निदर्शने करन्यात येणार आहे.
आजाद समाज पार्टी “उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळवले आहे.