*नवी मुंबईतील घणसोली गावात सतत वीज जात असल्यामुळे नागरिक त्रस्त*
गेल्या वर्षी घणसोली गावातील माजी नगरसेवक कै. दीपक दगडू पाटील यांनी मा.ना. ऊर्जामंत्री नितीन राऊत महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचेकडे निवेदन देऊन निदर्शनास आणले होते त्या अनुषंगाने मा.ना. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता मा. सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता मा. माने व कार्यकारी अभियंता मा. श्री. बोरसे आणि प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. जाधव हे पाहणी करता घणसोली गावामध्ये आले असता त्यांनी कामाचे आदेश दिल्या प्रमाणे घणसोली गावातील जळलेली डीपी तसेच केबल कनेक्शन काम सुरु स्वतः दीपक पाटील व सर्व पधादिकारी यांनी करून घेतले होते, त्यानंतर काही महिने वीज सुरळीत सुरु होती. पण नंतर घणसोली गावातील दिवसा व रात्रीची वेळी पाच-सहा तास वीज सतत जात असल्या कारणाने नागरिक हैराण झाले असून, एकीकडे वीज खंडीत केली जाते तर दुसरीकडे भरमसाठ वीज बीलचा सामाना करावा लागत असे.
यावेळी नवी मुंबईचे युवक काँग्रेचे मा. अभिषेक दीपक पाटील यांनी बोलताना सांगितले की, जर सतत वीज पुरवठा खंडीत होण्याचे नाही थांबले तर येणाऱ्या काही दिवसात नवी मुंबई युवक काँग्रेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढु असे सांगण्यात आहे.